Sunday, 20 April 2014

(48) महाराजा यशवंतराव होळकर (पोवाडा)

सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥ध्रुवपद॥

वडील नावकर मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । जे सावध होते परंतु सर्यत केली सरतासरती । भाऊ यशवंतराव बहादर ऐकून घ्याया ह्या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दों वर्षांमधिं घ्या गणती । बनकस कंपू पठाण कडिये फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देति लढावुन टोपीवाले नाहीं गणती । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बाहेरी ॥सुभे०॥१॥

शहर पुण्याशीं यावें ऐसा विचार ठरला फौजेचा । दरकूच घेउनि आघाडी मुकाम केला फलटणचा । मागून दुसरा गोलपठाणशाह आमदखान मीरखानचा । मार्गीं येतां लढाई संग्राम झाला टोपीवाल्याचा । उद्यां लढाई दुसरी नेमिली आला हलकारा लष्करचा । खाशासुद्धां करुनि तयारी मुकाम केला जेजूरिचा किं मल्हाराचें दर्शन घ्यावें मग निर्दाळावे वैरी ॥सुभे०॥२॥

सोमवारच्या दिवशीं प्रातःकाळीं लढाई नेमिली । फत्तेसिंगमानी यांणीं तल्लख लिहून पाठविली । अशी लढाई करा म्हणावें मागें मोहरें नाहीं जाहली । टोपीवाले फार हरामी त्यांनीं बहु धुंद केली । सवाई यशवंतराव जाऊन अंगें तरवार चमकविली । दोन लाख फौजेमधिं जाऊन कणसापरि कत्तल केली । तमाम कंपू पळ सुटला चहूंकडे गेले हो पेंढारी ॥सुभे०॥३॥

सवाई मल्हार ऐका गर्दी झाली त्यावरती । बेफाम होते परंतु भली केली सरतांसरती । सवाई यशवंतराव बहादर ऐकून ध्याव्या या कीर्ति । दोन लाख फौजेचा जमाव दोप्रहरांमधिं ध्या गणति । बंक कंपु पठाण कडवे फौजेमधिं नित्य झडती । मान भिडावून देती लुढावून टोपीवाले नाहीं गणती । फत्तेसिंग मान्या कुलअखत्यारी ऐकुनि घ्या या शूर मूर्ति । नागोपंत सरदार शिपाई अनेक उमराव हे बहिरी । जसा कृष्ण अवतार मुरारी गोपिकांवर कृपा करी ॥सुभे०॥४॥

सुभेदार महाराज प्रतापी नामें ऐक एक मोहोरा । कारभारी ऐकुनि घ्यावे हरनाथाचा कुलकल्ला । शहर पुण्याची नाकेबंदी वागुं देईना पसारा । खटमार मोठा कठिण नाहीं कुठें ऐकिली तर्‍हा । मार देउनि खंडण्या घेतो चौमुलखामधिं दरारा । वडिला वडिलीं पुरुषार्थ महिमा सवाई यशवंतराव जुरा । अनंद फंदीचे छंद ऐकतां लढाई झाली ही सारी । सुभेदार यशवंत कन्हया सदा फत्ते करी तलवारी । सवाई यशवंतराव होळकर प्रसन्न मल्हारी हस्त शिरीं ॥सुभे०॥५॥

संदर्भ - 'अनंत फंदी यांच्या कविता व लावण्या', मुद्रक- रा. रा. शंकर नरहर जोशी, १९२१. 

Thursday, 17 April 2014

(47) पायपीट

मुके जीव जगवण्यासाठी कडाक्याच्या थंडीतही स्वत:च्या कुटुंबाची पर्वा न करता पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागांतून तळकोकणात शेकडो मेंढरं घेऊन येणार्‍या धनगरांची पायपीट अंतर्मुख करायला लावणारी असते. दिवाळीनंतर घराबाहेर पडणारे हे कबिले होळीपर्यंत आपल्या घरी परततात. पाच महिन्यांचा हा त्यांचा प्रवास रोमांचकारी अनुभवांनी भरलेला असतो.

पश्चिम महाराष्ट्राच्या विविध भागांतील धनगर समाज आजही शेकडो मेंढरं पाळून या व्यवसायावर आपला उदरनिर्वाह करीत आहेत. बदलत्या काळात या समाजातील मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येऊन वर्षानुवर्षे होणारी आपल्या आईवडिलांची फरफट थांबवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र भावी पिढीला चांगलं शिक्षण देण्यासाठी सध्याच्या मंडळींना शेकडो किलोमीटरची पायपीट करावीच लागत आहे. 

एका कबिल्याकडे किमान तीनशेपर्यंत मेंढ्या असतात. पायात अस्सल जाड चामडी चप्पल, खांद्यावर घोंगडी, हातात मजबूत काठी घेऊन धनगर समाजातील दोघे किंवा तिघे दिवाळी झाल्यावर लगेचच चारापाण्यासाठी तळ कोकणचा रस्ता चालू लागतात. या कबिल्याबरोबर तीन ते चार खेचरं जेवण करण्यासाठी दोन महिला, त्यांची मुलं, खेचरांच्या पाठीवर संसारोपयोगी साहित्य, चालू न शकणारी मेंढरांची छोटी पिल्लं असं सारं सामान रचलेलं असतं. ही मंडळी नेहमी पुढे असतात. याच्यासह रात्रीच्या वेळी मेंढरांचं रक्षण करण्यासाठी दोन अस्सल धनगरी कुत्रेही सोबत प्रवास करीत असतात. 

या मंडळींची दरवर्षीची मुक्कामाची ठिकाणं ठरून गेलेली आहेत. सातारा - पाटणकडील ही मंडळी अवघड अशा कुंभार्ली घाटातून तळकोकणात उतरतात. दररोज पाच ते आठ कि.मी. अंतर कापल्यावर या कबिल्याचा ढेरा पडतो. महिलावर्ग पाण्याजवळची जागा मुक्कामासाठी निवडून तंबू ठोकतात. सायंकाळपर्यंत या मुक्कामाच्या ठिकाणी मेंढारांचा कबिला पोहोचतो. दिवसभराच्या थकावटीने कडाक्याच्या थंडीतही सारं कुटुंब निद्राधीन होतं. रात्रीच्या वेळी कोकणात मेंढारांच्या कळपाभोवती हमखास बिबट्याची फेरी ठरलेलीच असते. मात्र अशा वेळी सर्व मेंढरांचं रक्षण करण्याचं काम इमानदार; परंतु तेवढेच तिखट असणारे धनगरी कुत्रे करतात. रात्रभर हे कुत्रे कळपाने बसलेल्या मेंढरांभोवती गोल गोल फिरत असतात. बिबट्या जवळपास आला तर ओरडून ओरडून कल्लोळ करतात. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून बिबट्याला पळवून लावतात.

काही शेतकरी, मेंढरं शेतात बसविण्याबद्दल धनगर मंडळींना पैसे किंवा भात देतात. पूर्वी घरातून एकदा बाहेर पडल्यानंतर पाच महिन्यांनी घरी परतेपर्यंत घराकडील कोणतीही खुशाली या मंडळींना समजत नव्हती. मात्र आधुनिक काळात मोबाईलमुळे ही मंडळी एकदिवसआड आपल्या घरच्या मंडळींजवळ संपर्क साधून आपली खुशाली व मुक्कामाचे ठिकाण कळवतात. गेली अनेक वर्षे धनगर मंडळींची मुक्या प्राण्यांच्या चारापाण्यासाठीची शेकडो कि.मी.ची ही पायपीट आजही सुरू असून जवळपास पाच महिने शेकडो मेंढरांसह आपला कुटुंबकबिला घेऊन घराबाहेर राहात, भटकंती करणारा हा समाज नकळत अनेक बाबतीत सर्वांनाच अंतर्मुख करायला लावतो.

-जे. डी. पराडकर
jdparadkar@gmail.com

Monday, 14 April 2014

(46) माझ्या कानड्या मल्हारी (खंडोबा गीत)

।। यळकोट यळकोट जय मल्हार ।।

माझ्या कानड्या कानड्या मल्हारी
गातो यळकोट मल्हारी कैवारी ।।धृ।।

तुझ्या कानडं कानडं पणाला
बानू भाळली भाळली गुणाला
यावं भक्‍ताच्या भक्‍ताच्या वाड्याला
देवा सोडावी सोडावी जेजुरी ।।०१।।

बानू देवाची देवाची आवडी
शेळ्या मेंढ्यांच्या मेंढ्यांच्या परवडी
दह्या दुधाच्या दुधाच्या कावडी
घुसळण घातील घातील मंदिरी ।।०२।।

माझा देव हो देव हो झालाय येडा
लुटी धनगर गावड्याचा वाडा
असतील आपुल्या आपुल्या हो नडी
या हो पावन होईल ही पिढी ।।०३।।

शिवराईत जागर मांडिला
वाघ्या-मुरळीनं भंडार उधळिला
दीपमाळ ही उजळावी वक्‍ताला
हुईल आनंद यळकोट अंतरी ।।०४।।

स्वर - शाहीर पुंडलीक फरांदे
http://www.aathavanitli-gani.com/Song/Majhya_Kanadya_Malhari

(45) धनगराची नार (खंडोबा गीत)

धनगराची नार, बानू चंद्राची कोर,
येडा झालाय ग माझा देव मल्हार ।।धृ।।

मुखी पानाचा इडा, हाथी मोत्याचा चुडा,
नजरची धार येडा झालाय मल्हार,
बाई ग देव मल्हार ।।१।।

जस गुलाबच फुल, तस गोरगोर गाल,
नजरची धार येडा झालाय मल्हार,
बाई ग देव मल्हार ।।२।।

अहो साडी ती रेशमाची, अंगी चोळी खणाची,
नवरत्नाचा हार येडा झालाय मल्हार,
बाई ग देव मल्हार ।।३।।

बानू भागवत गाण्याला, भाऊ यशवंत जोडीला,
करती जागर गर्जुनी येळकोट मल्हार,
बाई ग देव मल्हार ।।४।।

गीत - शहाजी भागवत वागे
अल्बम - पालीला जायचं (२०००)
गाणे ऐकण्याची लिंक - http://www.hungama.com/music/song-banu-dhangarachi-naar/365275#/music/song-banu-dhangarachi-naar/365275

(44) धनगराची मेंढरं (मराठी गीत)

धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं !
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

अवो साजिरी दिसत्यात
ही गोजिरवाणी हरणं
पर मानुस लई उफराटा
काळं त्याचं करणं
अवो त्याची भूक लई मोठी
त्याची दानत लई खोटी
सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती, सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती !
आन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

आसं पुराणात लेकरु होतं
त्याचं श्रावण बाळं
आंधळं आई-बाप बोललं
काशीला घेऊन चल
जलमदात्याची सेवा केली
दोघं दोन्हीकडं बसली
चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली, चालला बिगिबिगी हरणाच्या पाउली !
आन्‌ खांद्यावरी कावड गा वाजतीया करकर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

ऊन सोसवंना उतरला
बघुन एक झाड
आई-बा म्हणालं
घशाला पडली कोरड
भांडं घेऊन गेला फुडं
आलं पान्यामंदी बुडबुडं
तिथं घडु नये ते इपरित घडलं, तिथं घडु नये ते इपरित सारं घडलं !
आन्‌ बाण आला, घुसला गा काळजाच्या पातुर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

मोठी कथा हाय्‌ दुनियेला ठावं
सांगणारा सांगून गेला
उरलं त्याचं नाव
आता कलियुग आलं
जग उफराटं झालं
अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं, अहो बघंल तिथं दिसतंया सारं काळं !
आन्‌ मायेचा गा झरा गेला, आटलाया पाझर
मातीवानी काळं कोणी दुधावानी पांढरं !

चित्रपट - मला तुमची म्हणा
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - राम कदम

http://www.aathavanitli-gani.com/Song/Dhanagarachi_Mendhara_Ga

Sunday, 13 April 2014

(43) Dhangar Caste

Other Spellings / Synonyms :
Dhangars are known by different names in different regions of the country namely, Andar, Ahiyaru, Bharavadaru, Doddi, Gowda, Gaddi, Gadri, Gollavadu, Gowda, Halumatha, Heggades, Idyar, Kuruba, Kuruba Gowda, Kurumba, Goundar, Kurumbar, Kalavar, Kuruma, Kurumavaaru, Kurkhi, Kurupu, Naikers, Palaru, Paalakyatriya, Poduvar, Yadavalu 

Varna :
Kshatriya

Clans :
Dhangars have 32 Clans

Subcastes :
Main Dhangar subcastes in Maharashtra are Ahir, Hatkar, Khutekar, Sengar/Shegar, Sangar, Bande, Konkani, Khatik, Zende, Dange, Zade, Jade (derived from Yadu), Dhanawar, Kuruba, Lad Mendhe, Pal, Gadari, Kurbar, Khatik, Gadhariya, Metkari, Gadge, Gawali, Kambar, Kshitri, Khillari, Bhillari, Kuktekar, Mhaskar, Shirotya and Utekar.

Language :
Hindi and its dialects, Punjabi, Gujarati, Marathi and Kannada

Regional Spread :
Northern India, Western India mainly Maharashtra, Southern India, and Central India. 

Traditional Occupation :
Dhangars traditionally have been warriors, shepherds and farmers.

Related Communities :
The Rajputs and Marathas

Marriage Preference :
Prefer matrimonial alliances within their own community. In present times, however, the community has also become open to inter-caste marriages.

Famous Personalities:
Prominent Dhangars have been Hakkaraya and Bukkaraya, founders of Vijayanagara Empire, Pallavas, Hoysalas, Rathore, Holkars, Sids, Sangolli Rayanna etc. Great poets like Kalidasa, Kanakadasa are Dhangars.

History and Origin :
The Dhangar community is one of the oldest existing communities of India. The community traces its history to Mahabharata times. 

About Dhangars :
The Dhangar caste is primarily located in the Indian state of Maharashtra. Most Dhangars are shepherds. The literal translation of the name 'Dhangar' is "Who is wealthy". Dhangars are said to be descendants of Yadavas.

(42) Hatkar (Dhangar)

1. Derivation and historical notice.
Hatkar, Hatgar.1—A small caste of Berār, numbering about 14,000 persons in 1911. They are found principally in the Pusad tāluk of Yeotmāl District, their villages being placed like a line of outposts along the Hyderābād border. The Hatkars are a branch of the Dhangar or shepherd caste, and in some localities they are considered as a subcaste of Dhangars. The derivation of the name Hatkar is obscure, but the Hatkars appear to be those Dhangars who first took to military service under Sivaji and hence became a distinct group. “Undisciplined, often unarmed, men of the Māwals or mountain valleys above the Ghauts who were called Māwallees, and of those below the mountains towards the sea, called Hetkurees, joined the young leader.”2 The Hatkars were thus the soldiers of the Konkan in Sivaji’s army. The Ain-i-Akbari states that the Hatkars were driven westward across the Wardha by the Gonds. At this time (A.D. 1600) they were holding the country round Bāsim by force of arms, and are described as a refractory and perfidious race.3 “The Hatkars of Berār are all Bargi or Bangi Dhangars, the shepherds with the spears. They say that formerly when going on any expedition they took only a blanket seven cubits long and a bear-spear. They would appear to have been all footmen. The Nāiks or village headman of Bāsim were principally Hatkars. The duty of a Nāik was to maintain order and stop robbery; but in time they became law-breakers and their men the dacoits of the country. Some of them were very powerful, and in 1818 Nowsāji Nāik’s troops gave battle to the Nizām’s regular forces under Major Pitman before Umarkhar. He was beaten and sent to Hyderābād, where he died, and the power of the Nāiks was broken by Major Sutherland. He hanged so many that the Nāiks pronounce his name to this day with awe. To some of the Nāiks he gave money and told them to settle down in certain villages. Others who also came, expecting money, were at once hanged.”4 But it would appear that only those leaders were hanged who did not come in before a certain fixed date.

2. The Gauli Hatkar’s reverence for cattle.
The Hatkars are also called Bangi Dhangars, and in Berār rank above other Dhangars because they took to soldiering and obtained grants of land, just as the Marāthas rank above the Kunbis. Another group have given up sheep-tending and keep cattle, which is a more respectable occupation on account of the sanctity of cattle, and these call themselves Gauli Hatkars. These Gauli Hatkars have given up drinking liquor and eating fowls. They will not touch or sell the milk of buffaloes and cows before sunset on Mondays, the day on which they worship Krishna. If [206]any one is in need of milk on that day they will let him milk the animal himself, but will take no price for the milk. On a Monday also they will not give fire from their house to any member of a low caste, such as a Mahār. On the day of Diwāli they worship their cows, tying a bunch of wool to the animal’s forehead and putting rice on it; they make a mud image of Govardhan, the mountain held up by Krishna as an umbrella to protect the people from the rain, and then let the cows trample it to pieces with their hoofs. If a bullock dies with the rope halter through its nose, the owner is put out of caste; this rule also obtains among the Ahīrs and Gaulis, and is perhaps responsible for the objection felt in some localities to putting string through the nostrils of plough- and cart-bullocks, though it is the only means of obtaining any control over them.

3. Funeral rites.
Formerly the Hatkars burned the corpses only of men who died in battle or the chase or subsequently of their wounds, cremation being reserved for this honourable end. Others were buried sitting cross-legged, and a small piece of gold was placed in the mouth of the corpse. Now they either burn or bury the dead according to their means. Most of them at the time they were soldiers never allowed the hair on their face to be cut.

4. Exogamous groups.
The Hatkars of Berār are said to be divided into three exogamous clans who apparently marry with each other, their names being Poli, Gurdi and Muski. In the Central Provinces they have a set of exogamous sections with titular names of a somewhat curious nature; among them are Hakkya, said to be so called because their ancestor was absent when his cow gave birth to a calf; Wakmar, one who left the Pangat or caste feast while his fellows were eating; and Polya, one who did not take off his turban at the feast.

1. Based principally on the account of the Hatkars on p. 200 of Sir A. Lyall’s Berār Gazetteer, with some notes taken by Mr. Hīra Lāl in Buldāna.
2. Colonel Meadows Taylor, Tara, p. 404.
3. Ain-i-Akbari, quoted in Berār Gazetteer, p. 200.
4. Berār Gazetteer.

Source -'The Tribes and Castes of the Central Provinces of India' By R.V. Russell, Vol-III, Page-204.